
ठाकरे बंधूंचा पाच तारखेचा मोर्चा मतदारांची दिशाभूल करणारा-आमदार रवी राणाची ठाकरे बंधूंच्या मोर्चा वर टीका…
@ विदर्भ प्रजासत्ताक
हिंदी भाषा सक्तीला विरोध म्हणून मराठी भाषाची सक्ती महाराष्ट्रात असली पाहिजे यासाठी राज ठाकरे व उद्धव ठाकरे एकत्रित पाच तारखेला मोर्चा काढणार आहे, या मोर्चावर बडनेराचे आमदार रवी राणा यांनी टीका केली, तसेच उद्धव ठाकरे यांच्यावर रवी राणांनी हल्लाबोल करत मराठी माणसाविषयी प्रेम आता येत आहे, महाराष्ट्रातील प्रत्येक माणूस मराठी माणसासोबत उभा आहे, त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी ही नौटंकी थांबवावी.. तर मुंबई महानगरपालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मराठीचा मुद्दा समोर केला जात आहे, उद्धव ठाकरे यांना वाटते की आमचा झेंडा मुंबई महानगरपालिकेवर फडकला पाहिजे, तर मराठीचा कोणी महाराष्ट्रात विरोध करत नाही तर पाच तारखेचा मोर्चा मतदारांची दिशाभूल करणारा मोर्चा आहे अशी टीका रवी राणा यांनी केली, मुख्यमंत्री बनण्यासाठी काँग्रेसच्या दरबारात उद्धव ठाकरे गेले असही रवी राणा यांनी टीका केली
ताज्या बातम्यांचे अपडेट व दैनिक विदर्भ प्रजासत्ताक दररोज वाचा आता आपल्या मोबाईलवरच
आमच्या ग्रुप ला अत्ताच जॉईन व्हा !
आमच्या ग्रुप ला अत्ताच जॉईन व्हा !
