
बेघर ग्रामस्थांचे अतिक्रमण नियमीत करा
जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक
अमरावती,
: शहरालगत असलेल्या हातुर्णा येथे बरेच लोक ३० ते ३५ वर्षांपासून राहत आहेत. अनेकांना गावांमध्ये जागा नाही. एवढेच नव्हे तर, ग्रामपंचायत अंतर्गत घरकुल योजनेपासूनही वंचित ठेवल्या जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला.
बेघर ग्रामस्थांचे शासकीय जागेवरील अतिक्रमण नियमीत करून द्यावे, या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी महिलांनी बुधवारी (ता.१२) जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. उपजिल्हाधिकारी यांना आपल्या मागण्यांचे निवेदन सुषमा मोरे यांनी सादर केले.

दाखल गुन्हा मागे घेण्याची मागणी
जीवे मारण्याची धमकी आणि अॅट्रॉसिटी अॅक्ट अंतर्गत दाखल गुन्ह्याची चौकशी करावी. घरकुल योजनेसंदर्भात हातुर्णा ग्रामपंचायतमध्ये चौकशी केल्यामुळे हा गुन्हा राजकीय दबावातून दाखल करण्यात आला. त्यामुळे तो मागे घ्यावा, अशी मागणी सुषमा मोरेंसह हातुर्णा येथील बेघर महिला व ग्रामस्थांनी पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.