
जिल्हा कचेरीवर शहर व जिल्हा काँग्रेसची निदर्शने
जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर
मोदी शासनाच्या द्वेषपूर्ण व सूडबुद्धीने केलेल्या कारवाईचा निषेध
विदर्भ प्रजासत्ताक
दि.१८अमरावती
केंद्र शासनाने अलीकडे चालविलेल्या द्वेषपूर्ण व सूडबुद्धीने केलेल्या कारवाईचा निषेध करण्याकरिता शुक्रवारी शहर व जिल्हा काँग्रेसच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली तसेच याबाबतचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी यांना सुपूर्त करण्यात आले, जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख खासदार बळवंत वानखडे व शहराध्यक्ष बबलू शेखावत यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले,
मोदी शासनाने द्वेषपूर्ण भावनेतून व सूडबुद्धीने नॅशनल हेराल्ड या वृत्तपत्राची मालमत्ता मनमानी पद्धतीने जप्त केली. तसेच काँग्रेस नेत्या खा. सोनिया गांधी, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी व इतर ज्येष्ठ नेतेमंडळी विरुद्ध सत्तेचा दुरुपयोग करून कोर्टामध्ये चार्जशीट दाखल करण्याचा मोदी सरकारचा निर्णय हा लोकशाही परंपरेला घातक आहे. या अन्यायकारक निर्णयाच्या विरुद्ध राज्यस्तरावर काँग्रेसच्या वतीने आंदोलन केले जात आहे अशा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शुक्रवारी दुपारी बारा वाजता निदर्शने करण्यात आली, यावेळी केंद्र शासनाच्या वतीने घोषणाबाजी देखील करण्यात आली, या आंदोलनात जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख ,खासदार बळवंत वानखडे, शहराध्यक्ष बबलू शेखावत ,माजी महापौर विलास इंगोले, मिलिंद चिमोटे यांच्यास,हरिभाऊ मोहोड,सुधाकरराव भारसाकळे, बाळासाहेब हिंगणीकर,दयारामजी काळे,मुकद्दर खा पठाण,नामदेवराव तनपुरे,किशोरभाऊ देशमुख,संजयराव लायदे,विनोदभाऊ पवार,राहुल येवले,प्रदीप देशमुख,ईश्वर बुंदिले,अमोल चिमोटे,भैय्यासाहेब मेटकर,सहदेव बेलकर,महेंद्रसिंग गैलवार,राजाभाऊ हाडोळे, सच्चिदानंद बेलसरे, सागर देशमुख,विलास बोरेकर,मिर्झा जहीर बेग,हरीश मोरे,अमोल बोरेकार,कैलास आवारे,सुधीर रहाटे,बिट्टू मंगरुळे,सिद्धार्थ बोबडे,विठ्ठल सरडे,पंकज मोरे,भाई देशमुख,निलेश डांगे,राजाभाऊ बंड,मनोज देशमुख, अभय देशमुख,नरेंद्र मकेश्वर,अरुण गनथडे,मोहन सिंघवी,विदर्भकुमार बोबडे,शिवदास येवले आदींची उपस्थिती होती

अन्यथा तीव्र आंदोलन
केंद्र शासनाने अलीकडे हुकूमशाही चालवलेली आहे, विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू असून त्यांच्यावर कारवाई देखील केली जात आहे ,त्यामुळे या प्रकाराच्या विरोधात आता काँग्रेस रस्त्यावर उतरली असून शासनाविरोधात निदर्शने केली जात आहे ,केंद्र शासनाने हा प्रकार न थांबवल्यास रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करू
(बबलू देशमुख जिल्हाध्यक्ष काँग्रेस कमिटी)