
बच्चू कडूंच्या अन्नत्याग आंदोलनाचा पाचवा दिवस:
अमरावतीत टोलनाक्यावर टायर जाळून रास्तारोको, प्रहार कार्यकर्त्यांनी स्वत:ला जमीनीत गाडून घेतले
विदर्भ प्रजासत्ताक
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी पुकारलेल्या अन्नत्याग आंदोलनाला आता राज्यभरातून तीव्र प्रतिसाद मिळत आहे. अमरावती जिल्ह्यात प्रहार कार्यकर्ते आणि शेतकरी विविध ठिकाणी आंदोलन करत आहेत.
अमरावती जिल्ह्यातील टोलनाक्याजवळ टायर जाळून रास्तारोको करण्यात आला. त्यामुळे काही वेळ वाहतूक पूर्णतः ठप्प झाली होती. हे आंदोलन पोलिस बंदोबस्तात शांततेत पार पडले.
तसेच, काही प्रहार कार्यकर्त्यांनी स्वतःला प्रतीकात्मक स्वरूपात जमिनीमध्ये गाडून घेतले. यावेळी त्यांनी सरकारच्या धोरणांचा निषेध केला आणि शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचा इशारा दिला.
बच्चू कडू यांचे अन्नत्याग आंदोलन पाच दिवसांपासून सुरू असून, त्यावर अजून सरकारकडून ठोस प्रतिसाद आलेला नाही. त्यांच्या समर्थकांनी सांगितले की, जर लवकरात लवकर निर्णय झाला नाही, तर आंदोलन अधिक तीव्र रूप धारण करेल.
बच्चू कडू यांच्या शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी सुरू असलेल्या बेमुदत अन्नत्याग आंदोलनाला आता अधिक तीव्र स्वरूप येत चालले आहे. या आंदोलनाच्या समर्थनार्थ प्रहार कार्यकर्त्यांनी स्वत:ला जमीनीत गाडून घेत आंदोलन सुरू केले आहे.
सविस्तर बातमी अपडेट होतच आहे तुम्ही आमच्या साईड ला भेट देत रहा व वाचत रहा ताजे अपडेट
जाहिरात,बातमी साठी सम्पर्क करा अरुण जोशी मो. ८६०५९४८८५३